प्रधानमंत्री उज्ज्वला योजना | Pradhanmantri Ujjwala Yojana  –

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना | Pradhanmantri Ujjwala Yojana  –

    आपल्या राज्य सरकारकडून तसेच केंद्र सरकारकडून वेगवेगळ्या उद्देशाने वेळोवेळी विविध योजना राबवल्या जात असतात. घरोघरी स्वयंपाक करण्यासाठी गॅसचा किंवा इलेक्ट्रिक स्टोव्हचा किंवा चुलीचा उपयोग केला जातो. परंतु चुलीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये केला जातो. आवड म्हणून चुलीवर स्वयंपाक करणे ही गोष्ट नक्कीच वेगळी आहे परंतु काहींची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याकारणाने असे काही लोक गॅस खरेदी करू शकत नाही आणि त्यामुळे ते चुलीवर स्वयंपाक करतात. परंतु चुलीवर स्वयंपाक केल्यामुळे प्रदूषण सुद्धा होते तसेच त्यामुळे घरामधील स्त्रियांना तसेच छोट्या बालकांना किंवा इतर व्यक्तींना त्याचा त्रास होऊन काही आजार सुद्धा उद्भवू शकतात. परंतु आता सरकारने प्रधानमंत्री

Advertisement
उज्वला योजना आणली आहे, ज्यामुळे ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे अशांना गॅस खरेदी करण्यामध्ये मदत होईल. या योजनेबद्दलच माहिती आज आपण जाणून घेणार आहोत…

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना | Pradhanmantri Ujjwala Yojana  –

  • केंद्र सरकारने यापूर्वी आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच दारिद्र्यरेषेखाली असणाऱ्या जवळपास पाच कोटी कुटुंबांना एलपीजी गॅस कनेक्शन देण्याचा संकल्प केला होता ,परंतु प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत हा लाभ आता दारिद्र्यरेषेखालील आठ करोड कुटुंबांना घेता येईल.
  • दारिद्र्यरेषेखालील जनता व आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या जनतेला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेता येणार आहे.
  • त्याचबरोबर जे कामगार स्थलांतर करीत असतात म्हणजेच स्थलांतरित कामगारांना सुद्धा प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ मिळू शकतो त्यासाठी या कामगारांना वास्तव्याचे प्रमाण म्हणून स्वयं प्रमाणित घोषणापत्र सादर करावे लागणार आहे.
  • १६०० रुपयांचा आर्थिक सहाय्य प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत एलपीजी कनेक्शन घेण्यासाठी दारिद्र रेषेखालील कुटुंबांना केले जाणार आहे.
  • या योजनेअंतर्गत जे एलपीजी गॅस कनेक्शन दिले जाईल ते कुटुंबांमधील महिलेच्या नावाने दिले जाणार आहे.
  • दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत १४.२ किलो वजन असलेला एलपीजी सिलेंडर दिला जाईल तर देशामधील दुर्गम तसेच डोंगराळ भाग अशा ठिकाणी मोठा सिलेंडर ट्रान्सपोर्ट करणे शक्य नसल्याकारणाने त्या ठिकाण ५ किलो वजनाचे २ एलपीजी सिलेंडर देण्यात येणार आहे.
  • तसेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमुळे जंगल तोडीचे प्रमाण सुद्धा बऱ्यापैकी कमी होईल.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2023 पात्रता | Eligibility for Pradhanmantri Ujjwala Yojana –

  • अर्ज करणारी व्यक्ती महिला असावी तसेच ही महिला भारताची नागरिक असणे आवश्यक असून या महिलेचे वय १८ वर्षापेक्षा जास्त असावे.
  • अर्जदारा जवळ बीपीएल कार्ड किंवा बीपीएल शिधापत्रिका असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार महिला ही दारिद्र रेषेखालील कुटुंबातीलच असावी तसेच इतर कोणाकडेही या कुटुंबामध्ये एलपीजी गॅस कनेक्शन नसावे तरच या योजनेचा लाभ घेता येईल.
  • कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये अर्जदाराचे बचत खाते असणे आवश्यक आहे.
  • १४ – सूत्री घोषणानुसार गरीब कुटुंबे या योजनेसाठी पात्र आहेत.
  • दारिद्र्यरेषेखाली असणारे कुटुंबे,अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, सर्वाधिक मागासवर्गीय कुटुंबे, वनवासी,  हे कुटुंबे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी पात्र आहेत.
  • अर्जदर  महिलेचे नाव जनगणना २०११ ( SECC – 2011) या यादीमध्ये असणे आवश्यक आहे ,तसेच  अर्जदाराचे नाव तेल विपणन कंपन्यांच्या डेटाबेस मध्ये असलेल्या बीपीएल माहितीशी सुद्धा जुळणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे | Documents required for Pradhanmantri Ujjwala Yojana :

  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • जाती प्रमाणपत्र
  • आधार कार्ड क्रमांक ( ओळखीचा पुरावा म्हणून अर्जदाराचे आधार कार्ड)
  • जन-धन बँक खात्याचा नंबर
  • बीपीएल रेशनकार्ड (ज्या राज्यातून अर्ज केला जात आहे त्या राज्याने जारी केलेले रेशनकार्ड)
  • पंचायत अधिकारी / नगर पालिका यांनी प्रमाणित केलेले बीपीएल प्रमाणपत्र
  • कुटुंबातील सदस्यांचा आधार क्रमांक
  • कुटुंबाच्या स्थितीला आधार देण्यासाठी पूरक KYC 

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अर्ज करण्याची प्रक्रिया | Application process of Pradhanmantri Ujjwala Yojana : 

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी ऑनलाईन तसेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणे शक्य आहे.

 🔸

ऑनलाइन पद्धतीने अर्ज  करण्यासाठी  –

https://www.pmuy.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जावे.

🔸ऑफलाइन पद्धतीने करण्याची प्रक्रिया

  • नजीकच्या एलपीजी वितरण केंद्रामध्ये हा अर्ज मिळेल तसेच अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्जाची प्रिंट सुद्धा काढून घेऊ शकता.
  • अर्ज व्यवस्थित भरून त्यासोबत लागणारी सर्व कागदपत्रे जोडावी.
  • भरलेला फॉर्म एलपीजी वितरण केंद्रामध्ये जमा करावा.
  • प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी अर्ज करत असताना सिलेंडर १४.२ किलो वजनी हवा की ५ किलो यासाठी केवायसी फॉर्म भरणे सुद्धा आवश्यक आहे.
  • नंतर एलपीजी केंद्र अधिकाऱ्याकडून अर्ज तसेच कागदपत्रांची संपूर्ण पडताळणी करण्यात येते त्यानंतर एलपीजी कनेक्शन लाभार्थ्यांना काही दिवसांमध्येच  दिले जाते.

आपण हे देखील वाचू शकता… लेक लाडकी योजना

Advertisement

Leave a Comment